Rishabh Pant: लढला, खेळला अन् ऋषभ पंतने वर्ल्ड रेकॉर्डसह इतिहास रचला, जगभरातला पहिलाच खेळाडू ठरला

✨ IND vs ENG:

ऋषभ पंत फलंदाजीला आला आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड रचला. आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला इंग्लंडमध्ये खेळताना अशी कामगिरी करता आली नव्हती. ऋषभ पंतने कोणता वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे, जाणून घ्या..

मँचेस्टर: दुखापतीनंतरही ऋषभ पंत लढला आणि मैदानात आला. ऋषभ पंतने तेव्हाच सर्वांची मनं जिंकली होती. पण या सामन्यात पंतने अशी एक कामगिरी केली की, जगभरात कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी आतापर्यंत करता आलेली नाही.

Cricket World

पंतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले

चुकीचा फटका खेळताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. पंतच्या पायामधून रक्त येत होते आणि ते थांबत नव्हते, त्याच्यावर मैदानात उपचार करता येऊ शकत नव्हते. त्यामुळे पंतला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. ऋषभ पंतला सहा आठवड्यांची विश्रांती देण्यात आली. त्यामुळे पंत आता मैदानात उतरणार नाही, हे सर्वांनाच माहिती होते. पण शार्दुल ठाकूर बाद झाला आणि पंत मैदानात आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. पंतनेही यावेळी दमदार फटकेबाजी केली आणि त्याचबरोबर इतिहास रचला.

ऋषभ पंतने या डावात तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावांची दणकेबाज खेळी साकारली. पण ही खेळी साकारता त्याने इतिहास रचला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वातील कोणत्याही यष्टीरक्षकाला इंग्लंडमध्ये खेळताना एक हजार धावांचा पल्ला ओलांडता आला नव्हता. यापूर्वी हा वर्ल्ड रेकॉर्ड भारताचा माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. धोनीने इंग्लंडमध्ये खेळताना ७७८ धावा केल्या होत्या, पण पंत हा जगातला असा पहिलाच परदेशी यष्टीरक्षक ठरला ज्याला एक हजार धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. त्यामुळे ऋषभ पंतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पंतची ही फक्त अर्धशतकी खेळी नव्हती, तर त्याची जिद्द यावेळी पाहायला मिळाली. कारण पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि त्याला विश्रांती दिली होती. पण तरीही त्याने जिद्द दाखवली आणि तो खेळण्यासाठी मैदानात उतरला.

Rushabh Pant

ऋषभ पंतने मैदानात उतरताच अशी कामगिरी करून दाखवली की, जगभरात ती कोणालाच जमली नाही. पंतने या समन्यात अर्धशतक पूर्ण करताना तीन चौकार लगावले, तर दोन खणखणीत षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पंतच्या या अर्धशतकाच्या जोरावर भारताला साडे तिनशे धावांचा पल्ला ओलांडता आला

Dhruv

लेखन ही माझ्यासाठी केवळ अभिव्यक्ती नसून, विचारांना दिशा देणारी साधना आहे. समाजातील घडामोडी, संस्कृती, परंपरा, इतिहास आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करून त्यातील प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पैलू शब्दरूपात मांडणे हीच माझी ओढ आहे. साध्या बोलीभाषेत आणि सहज समजेल अशा शैलीत वाचकांसमोर कथा, लेख किंवा माहिती ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. वाचन, संशोधन आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची आवड यामुळे लेखन प्रवास अधिक समृद्ध होत आहे. माझ्या लिखाणातून वाचकांना केवळ माहितीच नाही, तर प्रेरणा, आनंद आणि विचारांची नवी दिशा मिळावी, हीच अपेक्षा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form